Posts

रिपब्लिकन नेते राजु गोडबोले च्या निधनाने आंबेडकरी चळवळीची हानी - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

Image
रिपब्लिकन नेते राजु गोडबोले च्या निधनाने आंबेडकरी चळवळीची हानी  - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले  प्रतिनिधी - मंजिरी साबळे  मुंबई दि.21-  भारतीय दलित पँथर पासुन आंबेडकरी चळवळीत काम करणारे रिपब्लिकन पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते ; रिपब्लिकन पक्षाचे छत्तीसगढ राज्य सरचिटणीस राजू गोडबोले यांच्या निधनाने आंबेडकरी चळवळीची मोठी हानी झाली आहे.दिवंगत राजु गोडबोले हे छत्तीसगढ मधील रिपब्लिकन पक्षाचे ज्येष्ठ नेते होते.त्यांना छत्तीसगढ मधील सामाजिक शैक्षणिक आणि बौध्द धम्म चळवळी बरोबरच रिपब्लिकन चळवळ वाढवण्यात मोठे योगदान दिले आहे.माझ्या नेतृत्वात त्यांनी भारतीय दलित पँथर पासुन एकनिष्ठपणे रिपब्लिकन पक्षाचे काम केले आहे.राजु गोडबोले यांच्या निधनाने रिपब्लिकन पक्षासोबत सबंध छत्तीसगढ मधील आंबेडकरी चळवळीची मोठी हानी झाली आहे.असे सांगत  रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांनी दिवगंत राजु गोडबोले यांना भावपूर्ण श्रध्दांजली वाहिली. छत्तीसगढच्या भिलाई येथील सियान सदन येथे रिपब्लिकन पक्षा तर्फे  दिवंगत राजु  गोडबोले यांची ...

रिपब्लिकन पक्षाच्या मुंबई प्रदेश महिला आघाडीच्या उपाध्यक्षपदी सौ.प्रितमाला साळवी यांची नियुक्ती

Image
रिपब्लिकन पक्षाच्या मुंबई प्रदेश महिला आघाडीच्या उपाध्यक्षपदी सौ.प्रितमाला साळवी यांची नियुक्ती प्रतिनिधी - मंजिरी साबळे    मुंबई दि.21- रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या आदेशानुसार रिपब्लिकन पक्षाच्या महिला आघाडी च्या मुंबई प्रदेशच्या उपाध्यक्षपदी सौ.प्रितमाला साळवी यांची अधिकृत नियुक्ती करण्यात आली आहे. रिपब्लिकन पक्षाच्या महिला आघाडीच्या मुंबई अध्यक्षा उषाताई रामलु यांच्या हस्ते सौ.प्रितमाला साळवी यांना नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आले.यावेळी रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रकाश जाधव ;महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष रेश्मा खान आदि मान्यवर उपस्थित होते.                                        रिपब्लिकन पक्षाचे नेते माजी मंत्री दिवंगत प्रितमकुमार शेगावकर यांच्या त्या सुकन्या आहेत.रिपब्लिकन चळवळीचे बाळकडु त्यांना लहान पणापासुन लाभले आहे.रिपब्लिकन चळवळीचा वारसा त्यांना घरातुनच लाभला आहे.त्यामुळे प्रितमाला पुलकेशी साळवी य...

मुंबई प्रदेश असंघटित कामगार व कर्मचारी काँग्रेस मुंबई ( के के सी) मेळावा.

Image
मुंबई प्रदेश असंघटित कामगार व कर्मचारी काँग्रेस मुंबई ( के के सी) मेळावा.  _____________ असंघटित कामगारांना त्यांच्या प्रश्नांवर एकजुटीने व ताकदि ने संघर्ष करण्याचे आवाहन मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा व खासदार प्राध्यापक वर्षाताई गायकवाड यांनी केले .मार्गदर्शनपर भाषणामध्ये त्यांनी सांगितले की काँग्रेस पक्षाच्या झेंड्याखाली फेरीवाले, घरेलू कामगार, छोट्या उद्योगांमध्ये काम करणारे कामगार, तसेच ओला, उबेर, झोमॅटो, ॲमेझॉन या प्लॅटफॉर्मवर काम करणारी कामगार यांच्या मागण्यासाठी संघटित होणे गरजेचे आहे. कामगार कायद्याचे उल्लंघन केले जाते, न्याय मागणाऱ्या कामगारांना राज्य सरकार न्याय देत नाही, नुसते खोटे आश्वासन देत आहे.  त्यांनी येणाऱ्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये कामगारांनी काँग्रेस पक्षाला सहकार्य करण्याचे आवाहन केले.  कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी के के सी च्या अध्यक्षा श्रीमती. नीता महाडिक होत्या. त्यांनी मुंबई महानगरपालिके अंतर्गत असणाऱ्या कामा हॉस्पिटल मधील कंत्राटी कामगारांची व्यथा मांडली. येथील कामगारांना गेल्या तीन महिन्यापासून वेतन देण्यात आले नाहीत, त्यांचा प्रॉ...

हरवलेली पिशवी, सापडलेली माणुसकी

Image
  माणुसकी अजूनही जिवंत आहे, हे पुन्हा एकदा सिद्ध केलं डोंबिवलीच्या एका प्रामाणिक रिक्षाचालकाने. डोंबिवली, दि. 29 जून 2025  रात्री 9 वाजण्याच्या सुमारास स्टेशन ते शंकेश्वर स्टॅन्ड या मार्गावर प्रवास करणाऱ्या एका दांपत्याची महत्त्वाची पिशवी रिक्षात विसरली गेली. या पिशवीत रोख रक्कम आणि कपडे असा महत्त्वाचा ऐवज होता. ही पिशवी रिक्षाचालक संतोष वरकुटे यांच्या रिक्षात राहिली होती. विशेष म्हणजे, पिशवी हरवली आहे हे लक्षात येताच त्या दांपत्याच्या चेहऱ्यावर काळजी व हतबलता स्पष्ट दिसत होती. महिलेला तर अश्रू अनावर झाले होते. त्यांना वाटले होते की आपली रोख रक्कम व वस्तू परत मिळणे अशक्य आहे. मात्र रिक्षा स्टॅन्डवरील इतर सहकारी रिक्षाचालकांनी त्यांना धीर दिला आणि शक्य तेवढ्या लवकर वस्तू शोधण्यास सुरुवात केली.  आणि जर ती संतोष वरकुटे यांच्या रिक्षात राहिली असेल तर ती भेटणारच असा विश्वासही दिला. प्रवाशांनी दिलेल्या रिक्षा व चालकाच्या वर्णनावरून रिक्षाचालकांनी अंदाज बांधला की कदाचित संतोष वरकुटे यांच्या रिक्षातच ती पिशवी राहिली असावी. याच दरम्यान संतोष वरकुटे रिक्षा बंद करण्याच्या तयारीत होत...

एसएनडीटी महिला विद्यापीठाला NAAC कडून A+ मानांकन आणि 3.27 CGPA प्राप्त

Image
मुंबई, जून 2025: एसएनडीटी महिला विद्यापीठाला नॅशनल असेसमेंट अ‍ॅण्ड अ‍ॅक्रेडिटेशन कौन्सिल (NAAC) कडून प्रतिष्ठेचे A+ श्रेणी मानांकन आणि 3.27 CGPA प्राप्त झाले आहे, याची विद्यापीठास अभिमानपूर्वक घोषणा करत आहे. ही उल्लेखनीय कामगिरी विद्यापीठाच्या गुणवत्तापूर्ण शिक्षण, समावेशक शिक्षणपद्धती व शैक्षणिक उत्कृष्टतेच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचे प्रतीक आहे. माननीय कुलगुरू प्रा. डॉ. उज्वला चक्रदेव यांच्या गतिमान नेतृत्वाखाली विद्यापीठाने अध्यापन, संशोधन, नवोपक्रम आणि समाजाभिमुख उपक्रमांमध्ये सातत्याने प्रगती साधली आहे. या यशामागे विद्यापीठातील सर्व प्राध्यापक, कर्मचारी, अंतर्गत गुणवत्ता हमी प्रकोष्ठ (IQAC) आणि हितधारकांचे अथक परिश्रम व संघभावना आहे. विद्यापीठाच्या यशस्वी वाटचालीत खालील प्रमुख अधिकाऱ्यांचे महत्त्वाचे योगदान आहे: कुलगुरू डॉ. उज्वला चक्रदेव यांच्या नेतृत्वात प्र-कुलगुरू प्रा. रूबी ओझा, कुलसचिव प्रा. विलास नांदवडेकर, IQAC संचालक प्रा. प्रज्ञा वाकपैंजण तसेच, सर्व अधिष्ठाते, वित्त व लेखा अधिकारी, परीक्षा व मूल्यांकन संचालक, संचालकगण आणि प्रशासनातील सर्व घटकांनी यासाठी मेहनत घेतली आहे. य...

मराठा आरक्षणावर चर्चा : केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांची मनोज जरांगे-पाटील यांच्याशी

Image
मराठा आरक्षणावर चर्चा : केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांची मनोज जरांगे-पाटील यांच्याशी भेट  जालना/मुंबई, ३० जून :** मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणात केंद्रस्थानी असताना, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मराठा आंदोलनाचे प्रमुख नेते मनोज जरांगे-पाटील यांची रविवारी रात्री अंतरवाली सराटी येथे भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. सुमारे अर्ध्या तास चाललेल्या या चर्चेत मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांवर सखोल विचारविनिमय झाला. यावेळी मनोज जरांगे-पाटील यांनी आपल्या मागण्यांचे निवेदन आठवले यांच्याकडे सुपूर्द केले. मंत्री आठवले यांनी हे निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत पोहोचवण्याचे आश्वासन दिले असून लवकरच फडणवीस यांच्याशी या विषयावर चर्चा करणार असल्याची माहिती दिली. रामदास आठवले यांनी सांगितले की, "मनोज जरांगे-पाटील यांच्या आंदोलनामुळे अनेक प्रश्न मार्गी लागले, मात्र काही मुद्दे अद्याप प्रलंबित आहेत. मराठा समाजाला दिलेले १० टक्के आरक्षण योग्य आहे का, टिकेल का, याबाबत समाजात शंका आहे. कुणबी नोंदी नसलेल्या लोकांच्या लाभासाठी हैदराबाद, सातार...

हिंदीला तिसऱ्या भाषेचा दर्जा देण्याच्या निर्णयाविरोधात मुंबईत जाहीर सभा

Image
हिंदीला तिसऱ्या भाषेचा दर्जा देण्याच्या निर्णयाविरोधात मुंबईत जाहीर सभा प्रतिनिधी - मंजिरी परब साबळे  मुंबई – महाराष्ट्र शासनाच्या इयत्ता पहिलीपासून हिंदीला तिसरी भाषा म्हणून लागू करण्याच्या निर्णयाविरोधात राज्यातील विविध विचारधारांच्या संघटना एकवटल्या असून, या अन्यायकारक निर्णयाच्या निषेधार्थ प्रतिकात्मक होळी करण्यात आली आणि एक भव्य जाहीर सभा घेण्यात आली. मराठी अभ्यास केंद्र आणि समविचारी संस्था यांच्या वतीने या आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते. शिक्षणतज्ज्ञ, भाषाभ्यासक, राजकीय नेते आणि मराठीप्रेमी जनतेच्या उपस्थितीत ही सभा पार पडली. ही जाहीर सभा रविवार, २९ जून २०२५ रोजी दुपारी ३ वाजता, मुंबई मराठी पत्रकार संघ, बाळशास्त्री जांभेकर मार्ग,मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयासमोर, सीएसएमटी स्थानकाजवळ, मुंबई येथे घेण्यात आली. इयत्ता पहिलीपासून हिंदीला तिसरी भाषा म्हणून लागू करण्याच्या या निर्णयाविरोधात एकत्र येत, आयोजकांनी सरकारला स्पष्ट संदेश दिला आहे – “सरकार मागे हटणार नाही, आपणच पुढे होऊ या!” या घोषवाक्याखाली हा लढा उभारण्यात आला.  सभेदरम्यान जोपर्यंत निर्णय मागे घेत नाही तोपर्यं...