*"जय शिवसंग्राम संघटनेची मुंबई - ठाणे कार्यकर्ता बैठक व प्रवेश सोहळा "*
ठाणे : लोकनेते विनायकरावजी मेटे साहेब यांचा वैचारिक व सामाजिक विचारांचा वारसा चालवत त्यांचे छोटे बंधू रामहरी मेटे यांनी जय शिवसंग्राम संघटनेची स्थापना केली जय शिवसंग्राम संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रामहरी मेटे यांच्या उपस्थितीमध्ये मुंबई -ठाणे कार्यकर्ता बैठक व प्रवेश सोहळ्याचे आयोजन शासकीय विश्रामगृह, कोर्ट नाका जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ ठाणे येथे संपन्न झाले. लोकनेते स्व.विनायकरावजी मेटे साहेब यांचे छोटे बंधू रामहरी मेटे यांनी रायगडावर "जय शिवसंग्राम " या संघटनेची स्थापना केली आज ती संघटना महाराष्ट्र मध्ये झपाट्याने वाढत आहे त्याचाच एक भाग म्हणून आज मुंबई - ठाणे येथे कार्यकर्ता बैठक व प्रवेश सोहळ्याचे आयोजन करण्यात आले विद्यमान महाराष्ट्रातील राजकीय वातावरण ढवळून निघालेले आहे यामध्ये कोणी कोणाचा पक्ष पळवला तर कोणी कोणाची संघटना ! आज महाराष्ट्रातील राजकीय घराणे पाहिले असता येथील सर्वच वातावरण गढूळ झालेले आहे .स्वतः चे अस्तित्व निर्माण करण्यासाठी भावाचा किंवा चुलत्याचा पक्ष पळवण्यापेक्षा स्वतःच अस्तित्व सिद्ध करणे केव्हाही चांगलेच ... यासाठी संघर्ष करावा लागत...