नव-सागरदीप गृह निर्माण संस्थेत शिवजयंती - आंबेडकर जयंती उत्साहात साजरी


 नव-सागरदीप गृह निर्माण संस्थेत शिवजयंती - आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

मुंबई दि.१६(प्रतिनिधी)

कल्याण (पूर्व), कामना नगर येथील नव-सागरदीप सहकारी गृह निर्माण संस्था (मर्या.) यांच्या वतीने १४ एप्रिल रोजी महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची संयुक्त जयंती मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरी करण्यात आली.  


संस्थेतील चाळ क्रमांक २ आणि ३ मधील पॅसेज मध्ये आयोजित या कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ११ वाजता धम्म वंदनेने झाली. परिसरात धार्मिक आणि भक्तीमय वातावरण अनुभवायला मिळाले. सायंकाळी ५ ते ७ या वेळेत लहान मुलांसाठी विविध खेळ आणि स्पर्धा तसेच महिलांसाठी मनोरंजनात्मक उपक्रम राबवण्यात आले, ज्यांना उपस्थित नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

रात्री ८ ते ९ या वेळेत रंगलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमात संस्थेच्या महिला व बाल कलाकारांनी गीत, नृत्य आणि नाटिका सादर करून उपस्थितांची मने जिंकली. प्रेक्षकांनी टाळ्यांच्या गजरात कलाकारांना भरभरून दाद दिली.

कार्यक्रमाबाबत बोलताना संस्थेचे अध्यक्ष रामचंद्र बांधगळे म्हणाले, “छत्रपती शिवाजी महाराज हे स्वराज्याचे प्रतीक असून त्यांनी दिलेल्या शौर्य व न्यायप्रियतेच्या मूल्यांवर आपण चालत आहोत. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेला संविधानाचा प्रकाश आजही आमच्या वाटचालीस दिशा दाखवत आहे. त्यांचा हा संयुक्त जयंती सोहळा ही आपल्या संस्थेच्या सामाजिक एकतेचे व सांस्कृतिक जाणीवेचे साक्षात्कार आहे.”


संस्थेचे सचिव दिलीप मोहिते म्हणाले, “शिवाजी महाराजांची दूरदृष्टी आणि बाबासाहेबांची बौद्धिक क्रांती यांचा संगम म्हणजे आपली आजची प्रगती. अशा प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वांच्या स्मरणाने आजचा कार्यक्रम अत्यंत यशस्वी ठरला. संस्थेच्या सर्व सदस्यांचे, स्वयंसेवकांचे आणि सहभागी नागरिकांचे मन:पूर्वक आभार.”

या कार्यक्रमामुळे परिसरात उत्सवाचे आणि अभिमानाचे वातावरण निर्माण झाले. यावेळी संस्थेचे खजिनदार नारायण नारकर, कमिटी सदस्य अनंत सागवेकर, चंद्रकांत कुंभार, तानाजी कांबळे, श्रीमती तारा जाधव, कविता भाकरे, स्वप्नील जाधव, उत्सव कमिटी प्रमुख विलास सागवेकर, अधिक लोखंडे, नितेश जाधव, अनिकेत मोहिते, राकेश चव्हाण, विकास जाधव, संजय नवगिरे, रवी कोणार यांच्यासह विभागातील नागरिक, तरुण कार्यकर्ते आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

हा सोहळा परिसरातील सामाजिक ऐक्य, इतिहासाची जाण आणि संस्कृतीचा अभिमान व्यक्त करणारा ठरला.



Comments

Popular posts from this blog

प्रधानमंत्री/मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतील कंत्राटी कर्मचाऱ्यांचा उपोषण आंदोलन

जब आस्था ही अपराध बन जाए: पेयवंद नईमी की कहानी

हरवलेली पिशवी, सापडलेली माणुसकी